Search This Blog

Sunday, December 18, 2016

तिसऱ्या टप्प्यात 72.76 टक्के मतदान

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यात 72.76 टक्के मतदान
       मुंबई, दि. 18: राज्यातील चार जिल्ह्यांतील 19 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 72.76 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, 212 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका चार टप्प्यांत होत आहेत. आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. या 19 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या सदस्यांच्या एकूण 409 जागांसाठी 1 हजार 947 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. थेट नगराध्यक्ष पदाच्या 19 जागांसाठी 111 उमेदवारांमध्ये लढत झाली. या सर्व ठिकाणी एकूण 5 लाख 16 हजार 478 मतदारांसाठी 683 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 19 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषदेचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता; परंतु न्यायालयाच्या स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नाही. त्याचबरोबर देसाईगंज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील 9-ब या जागेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार या जागेसाठी आता 22 जानेवारी, 2017 रोजी मतदान होणार आहे, असे श्री.सहारिया यांनी सांगितले.
नगरपरिषदनिहाय झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार सरासरी टक्केवारी अशी: औरंगाबाद: कन्नड- 77.16, पैठण- 75.73, गंगापूर- 75.56 खुल्ताबाद- 79.77. नांदेड: धर्माबाद- 70.73, उमरी- 72.33, हदगाव- 67.04, मुखेड- 73.66, बिलोली- 69.48, कंधार- 83.12, कुंडलवाडी- 81.46, मुदखेड- 71.45, देगलूर- 74.68, अर्धापूर (न.पं.)- 78.46माहूर (न.पं.)- 78.56. भंडारा: पवनी- 72.69, भंडारा- 66.10, तुमसर- 70.58साकोली- 69.13. गडचिरोली: गडचिरोली- 69.24देसाईगंज- 78.75. एकूण सरासरी- 72.76.