Search This Blog

Wednesday, December 28, 2016

39 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान

39 ग्रामपंचायतींसाठी
सरासरी 82 टक्के मतदान
          मुंबई, दि.28: राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 39 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 82 टक्के मतदान झाले.
          सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी आजच मतमोजणीस सुरवात झाली. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 1, नाशिक- 9, अहमदनगर- 1, धुळे- 1, नंदुरबार- 1, पुणे- 6, औरंगाबाद- 1, नांदेड- 1, बीड- 1, यवतमाळ- 3, बुलढाणा- 2, वर्धा- 2 आणि भंडारा- 2. एकूण- 39.