Search This Blog

Friday, August 30, 2019

‘राज्य निवडणूक आयोग: रौप्य महोत्सवी वाटचाल’चे पुण्यात प्रकाशन


                                         निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया: सहारिया
पुणे, दि. 30 (रा.नि.आ.): निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. या सुधारणांच्या माध्यमातून निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या 25 वर्षेपूर्तीनिमित्त राज्य निवडणूक आयोग: रौप्यमहोत्सवी वाटचालया पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन श्री. सहारिया यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यावेळी उपस्थित होत्या. श्री. सहारिया यांचे 'निवडणूक सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका' या विषयावर यावेळी व्याख्यानही झाले.
श्री. सहारिया म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 5 वर्षांच्या काळात व्यापक सुधारणा केल्या आहेत. त्यात उमेदवारांच्या शपथपत्रातील माहितीला व्यापक प्रसिद्धी देणे, उत्पन्नाचे स्रोत जाहीर करणे व त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धी देणे, ‘नोटाजिंकल्यास फेरनिवडणूक घेणे, खर्चाचा हिशेब न देणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणे, लोकशाही पुरस्कार आदींचा समावेश आहे. भविष्यात यात निश्चितच आणखी भर घालावी लागेल.
आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे आणि पत्रकार सुनील चव्हाण यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. डॉ. बर्वे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय तांबट, प्रा. योगेश बोराटे, आयोगाचे कक्ष अधिकारी अतुल जाधव, श्री. मोरे, श्री. चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. श्री. निनाद भोंडे यांनी सूत्रसंचालन केले. राज्य निवडणूक आयोगाच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा या ग्रंथात आढावा घेण्यात आला आहे. 
पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते 'राज्य निवडणूक आयोग: रौप्यमहोत्सवी वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी डावीकडून उपस्थित प्रा. संजय तांबट, अतुल जाधव, जगदीश मोरे, श्री. सहारिया, सुनील चव्हाण, प्रा. योगेश बोराटे. (छायाचित्रः मयूर वाघ)



Monday, August 26, 2019

कॉफी टेबल बूकचे प्रकाशन

मुंबई येथे राजभवनात सोमवारी (ता. 26) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइऊ ईयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र’ कॉफी टेबल बूकचे प्रकाशन झाले. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्‌डी, आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर, राज्यपालाचे उपसचिव रणजित कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन
खेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल: राज्यपाल
मुंबई, दि. 26 (रा.नि.आ.): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइव्ह इयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे (कॉफी टेबल बूक) राज्यपालांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्‌डी, आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर, राज्यपालाचे उपसचिव रणजित कुमार आदींसह राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाने लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात निश्चितच मोलाचे योगदान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करून त्यासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याच्यादृष्टीने कॉफी टेबल बूकसारखे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात.
श्री. सहारिया म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विविध निवडणूक सुधारणा अंमलात आणल्या आहेत. या पुस्तकात त्याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतला आहे.
श्री. कुरूंदकर यांनी कॉफी टेबल बूकच्या प्रकाशनासंदर्भातील भूमिका निश्चित केली. त्यांनी आभार प्रदर्शनही केले. आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

Release of Coffee Table book


Release of Coffee Table book ‘25 Years of State Election Commission, Maharashtra’
Development of Village is essential to National Building
Mumbai, 26 August 2019, (S.E.C.M.): It is essential to strengthen and promote governance at village-level for facilitating development of democracy through a bottom-up approach. These local self-governments (LSGs) are supreme institutions and important to the process of Nation Building, said Shri. Ch. Vidyasagar Rao, Hon’ble Governor of Maharashtra, at the release of Coffee Table Book on ‘25 Years of State Election Commission Maharashtra’.
In the presence were Shri. J.S. Saharia, State Election Commissioner, Maharashtra, Shri. B. Venugopal Reddy, Principal Secretary of Governor of Maharashtra, Shri. K.V. Kurundkar, Secretary, State Election Commission, Maharashtra (SECM) and Shri. Ranjit Kumar, Dy. Secretary to Governor of Maharashtra.
Shri. Ch. Vidyasagar Rao expressed that in continuation of SECM’s role of promoting knowledge and its dissemination of LSGs and its elections, thought should be provided to publishing articles, columns, etc. across platforms to promote grassroots democracy and throw light on its role in the development and growth of our nation.
The State Election Commission, Maharashtra, has been able to undertake various electoral reforms and innovative practices to make elections to local bodies in Maharashtra free, fair and transparent, said Shri. J.S. Saharia. He added that the State Election Commission, Maharashtra, has been able to successfully perform its constitutional responsibilities with the positive cooperation of Government of Maharashtra, and through cooperation and linkages amongst various stakeholders in India and internationally.