Search This Blog

Friday, November 29, 2019

चंदगड, हातकणंगले व ढाणकी नगरपंचायतींसाठी 29 डिसेंबरला मतदान


चंदगड, हातकणंगले व ढाणकी नगरपंचायतींसाठी 29 डिसेंबरला मतदान
विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान
मुंबई, दि. 29 (रा.नि.आ.): कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित 3 नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 30 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 13 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 18 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.
नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका: मोर्शी, धरणगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी.
नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या जागांचा तपशील: गडहिंग्लज- हद्दवाढ क्षेत्रासाठी, मलकापूर- 7ब, वाई- 8अ, खानापूर- 7, बार्शी- 5अ, मनमाड- 1ब, भुसावळ- 4अ, भडगाव- 3ड, नवापूर- 6अ आणि 7अ, परंडा- 7ब, कळंब- 8ब, उमरेड- 11अ, भिवापूर- 4, सिंधी (रेल्वे)- 8क, मोहाडी- 4, 9 आणि 12, साकोली- 6ब, कोरपणा- 16, भामरागड- 5 आणि 16.

Tuesday, November 19, 2019

नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक


नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 जानेवारीला मतदान
मुंबई, दि.19 (रानिआ): नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

              निवडणूक कार्यक्रम
·        नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
·        नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
·        अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
·        अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
·        मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
·        मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020

विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 डिसेंबरला मतदान


विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.19 (रानिआ): रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, यवतमाळ आणि गडचिरोली या 11 जिल्हा परिषदांमधील 15 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 12 पंचायत समित्यांमधील 13 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 12 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 13 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 22 ते 27 नोव्हेंबर 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. 24 नोव्हेंबर 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- 45-निजामपूर (ता. माणगाव), सिंधुदुर्ग- 25-आंब्रड (कुडाळ), रत्नागिरी- 39-धामापूर तर्फे संगमेश्वर (संगमेश्वर), नाशिक- 19-मानूर (कळवण), 29- खेडगाव (दिंडोरी) व 59 गोवर्धन गट्टा (नाशिक), सांगली- 22 सावळज (तासगाव) व 48-कोकरूड (शिराळा), सातारा- 34-कुडाळ (जावली), कोल्हापूर- 28-दत्तवाड (शिरोळ), नांदेड- 50-पेठवडज (कंधार), लातूर- 6-सावरगाव रोकडा (अहमदपूर) व 25-वडवळ नागनाथ (चाकूर), यवतमाळ- 58-ढाणकी (उमरखेड) आणि गडचिरोली- 18-पेंढरी गट्टा (धानोरा).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: रोहा (जि. रायगड)- 80-आंबेवाडी, हवेली (पुणे)- 89-धायरी, नांदगाव (नाशिक)- 76-न्यायडोंगरी, निफाड (नाशिक)- 94-नांदुडी, पैठण (औरंगाबाद)- 121-पिंगळवाडी (पि.), उमरगा (उस्मानाबाद)- 94-माडज, उमरखेड (यवतमाळ)- 115-ढाणकी, उमरखेड (यवतमाळ)- 116-ब्राम्हणगाव, अहमदपूर (लातूर)- 01-खंडाळी, लाखांदूर (भंडारा)- 101-मोहरणा, भंडारा (भंडारा)- 59-पांढराबोडी, हिंगणघाट (वर्धा)- 96-शिरूड आणि वरोरा (चंद्रपूर)- 48-आबामक्ता.
        निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 22 ते 27 नोव्हेंबर 2019
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 28 नोव्हेंबर 2019
·         अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 4 डिसेंबर 2019
·         अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 7 डिसेंबर 2019
·         मतदानाचा दिनांक- 12 डिसेंबर 2019
·         मतमोजणीचा दिनांक- 13 डिसेंबर 2019

Friday, November 15, 2019

तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान


तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि. 15 (रा.नि.आ.): अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. त्यांची छाननी 25 नोव्हेंबर 2019 रोजी होईल. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2019 रोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

Thursday, October 31, 2019

नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणूक


नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणूक
प्रारूप मतदार याद्यांची 2 नोव्हेंबरला प्रसिद्धी
मुंबई, दि. 31 (रा.नि.आ.): नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता आयोगाच्या 31 मे 2019 च्या पत्रान्वये 10 एप्रिल 2019 या अधिसूचित दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या; परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या आद्या अद्ययावत केल्या आहेत. जुन्या याद्यांमुळे 11 एप्रिल 2019 ते 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत नोंदणी झालेले मतदार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या निवडणुकांसाठी नव्याने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 
नव्या कार्यक्रमानुसार 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 2 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 8 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 11 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

Friday, October 18, 2019

मतदार याद्यांची प्रसिद्धी


ग्रामपंचायत निवडणुकांसाठी
 1 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई, दि. 18 (रा.नि.आ.): राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 108 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासह पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघांच्या 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 6 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

Thursday, September 5, 2019

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान

नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांचे स्वागत करताना आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर.

यू. पी. एस. मदान यांनी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

मुंबई, दि. 5 (रा.नि.आ.): राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्री. यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून मा. राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
श्री. मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव श्री. किरण कुरुंदकर यांनी श्री. मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्री. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल (ता. 4) पूर्ण झाला.

Friday, August 30, 2019

‘राज्य निवडणूक आयोग: रौप्य महोत्सवी वाटचाल’चे पुण्यात प्रकाशन


                                         निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया: सहारिया
पुणे, दि. 30 (रा.नि.आ.): निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. या सुधारणांच्या माध्यमातून निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या 25 वर्षेपूर्तीनिमित्त राज्य निवडणूक आयोग: रौप्यमहोत्सवी वाटचालया पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन श्री. सहारिया यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यावेळी उपस्थित होत्या. श्री. सहारिया यांचे 'निवडणूक सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका' या विषयावर यावेळी व्याख्यानही झाले.
श्री. सहारिया म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 5 वर्षांच्या काळात व्यापक सुधारणा केल्या आहेत. त्यात उमेदवारांच्या शपथपत्रातील माहितीला व्यापक प्रसिद्धी देणे, उत्पन्नाचे स्रोत जाहीर करणे व त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धी देणे, ‘नोटाजिंकल्यास फेरनिवडणूक घेणे, खर्चाचा हिशेब न देणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणे, लोकशाही पुरस्कार आदींचा समावेश आहे. भविष्यात यात निश्चितच आणखी भर घालावी लागेल.
आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे आणि पत्रकार सुनील चव्हाण यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. डॉ. बर्वे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय तांबट, प्रा. योगेश बोराटे, आयोगाचे कक्ष अधिकारी अतुल जाधव, श्री. मोरे, श्री. चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. श्री. निनाद भोंडे यांनी सूत्रसंचालन केले. राज्य निवडणूक आयोगाच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा या ग्रंथात आढावा घेण्यात आला आहे. 
पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते 'राज्य निवडणूक आयोग: रौप्यमहोत्सवी वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी डावीकडून उपस्थित प्रा. संजय तांबट, अतुल जाधव, जगदीश मोरे, श्री. सहारिया, सुनील चव्हाण, प्रा. योगेश बोराटे. (छायाचित्रः मयूर वाघ)



Monday, August 26, 2019

कॉफी टेबल बूकचे प्रकाशन

मुंबई येथे राजभवनात सोमवारी (ता. 26) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइऊ ईयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र’ कॉफी टेबल बूकचे प्रकाशन झाले. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्‌डी, आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर, राज्यपालाचे उपसचिव रणजित कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन
खेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल: राज्यपाल
मुंबई, दि. 26 (रा.नि.आ.): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइव्ह इयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे (कॉफी टेबल बूक) राज्यपालांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्‌डी, आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर, राज्यपालाचे उपसचिव रणजित कुमार आदींसह राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाने लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात निश्चितच मोलाचे योगदान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करून त्यासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याच्यादृष्टीने कॉफी टेबल बूकसारखे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात.
श्री. सहारिया म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विविध निवडणूक सुधारणा अंमलात आणल्या आहेत. या पुस्तकात त्याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतला आहे.
श्री. कुरूंदकर यांनी कॉफी टेबल बूकच्या प्रकाशनासंदर्भातील भूमिका निश्चित केली. त्यांनी आभार प्रदर्शनही केले. आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

Release of Coffee Table book


Release of Coffee Table book ‘25 Years of State Election Commission, Maharashtra’
Development of Village is essential to National Building
Mumbai, 26 August 2019, (S.E.C.M.): It is essential to strengthen and promote governance at village-level for facilitating development of democracy through a bottom-up approach. These local self-governments (LSGs) are supreme institutions and important to the process of Nation Building, said Shri. Ch. Vidyasagar Rao, Hon’ble Governor of Maharashtra, at the release of Coffee Table Book on ‘25 Years of State Election Commission Maharashtra’.
In the presence were Shri. J.S. Saharia, State Election Commissioner, Maharashtra, Shri. B. Venugopal Reddy, Principal Secretary of Governor of Maharashtra, Shri. K.V. Kurundkar, Secretary, State Election Commission, Maharashtra (SECM) and Shri. Ranjit Kumar, Dy. Secretary to Governor of Maharashtra.
Shri. Ch. Vidyasagar Rao expressed that in continuation of SECM’s role of promoting knowledge and its dissemination of LSGs and its elections, thought should be provided to publishing articles, columns, etc. across platforms to promote grassroots democracy and throw light on its role in the development and growth of our nation.
The State Election Commission, Maharashtra, has been able to undertake various electoral reforms and innovative practices to make elections to local bodies in Maharashtra free, fair and transparent, said Shri. J.S. Saharia. He added that the State Election Commission, Maharashtra, has been able to successfully perform its constitutional responsibilities with the positive cooperation of Government of Maharashtra, and through cooperation and linkages amongst various stakeholders in India and internationally.